Sunday, July 29, 2018

बाजीराव मस्तानी भाग-8 कर्तबगारी व मृत्यू

कर्तबगारी 

•    पुण्यातील शनिवारवाडा महाल किल्ला, पेशवा शासन कर्त्यांचे  मराठा साम्राज्यातील आसन , याची कामगिरी बाजीरावांकडे सोपविली गेली होती.
•    बाजीरावांचा, ज्यांनी ४१ मोठी युद्धे आणि अनेक इतर युद्धे लढली, कधी हि पराभूत न झाल्याचा लौकिक आहे.
•    वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून , तुकड्यांमध्ये विभाजित झालेल्या मुघल साम्राज्याचा दुबळेपणा समजून घेणारे आणि त्याचा फायदा करून घेणारे ते पहिलेच होते. साम्राज्याच्या राज दरबारामध्ये सय्यद बांधवांचा ढळता प्रभाव हा , बाजीरावांच्या हल्ल्यांच्या निर्णयासाठी आणखी एक प्रभावी कारणीभूत घटक ठरला.
•    अनेक  भागांमध्ये  तुकडे झालेल्या मुघल साम्राज्या वर  सूड घेऊन नाश केल्या नंतर सिंधीयांची (राणोजी शिंदे )ग्वालियर येथील राज्य सत्ता, इंदोर चे होळकर (मल्हारराव ), बडोद्याचे गायकवाड (पिलाजी ), आणि धार चे पवार (उदाजी ) यांची निर्मिती मराठा साम्राज्याचा एक भाग म्हणून बाजीरावांनी केली. 
•    १७२८ मध्ये त्यांनी, त्यांचे मूळ सासवड वरून आणि मराठ्यांची प्रशासकीय राजधानी सातारा वरून पुण्याला हलविली. या प्रक्रिये दरम्यान त्यांनी कसब्याचे एका मोठ्या शहराच्या पायामध्ये रुपांतर केले. त्यांचे सेनापती, बापुजी श्रीपत , यांनी सातारच्या काही बड्या प्रतिष्ठित  कुटुंबाना गळ घालून पुणे शहरामध्ये स्थलांतरित होऊन स्थायिक केले, जी नंतर अठरा पेठेंमध्ये (नगरांमध्ये ) विभाजित करण्यात आली.
•    १७३२ मध्ये , महाराज छत्रसाल यांच्या मृत्युनंतर , मराठा साम्राज्याचे दीर्घ काळा चे घटक असलेल्या, बाजीरावांना बुंदेलखंड मध्ये छत्रसालाच्या प्रांतातील एक तृतीयांश भाग मंजूर करण्यात आला.
•    घोडदळा चे अतिशय कर्तबगार सरदार, असलेल्या बाजीरावांवर त्यांच्या सैन्य दलानि आणि लोकांनी भरभरून प्रेम केले. असे मानले जाते कि बाजीराव हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी लढले आणि मुघलांना उत्तर भारतावर नजर रोवण्या आधी , मध्य आणि पश्चिम भारतातून कायमचे हुसकावून लावले. त्यांच्या नेतृत्वाखाली , मराठ्यांनी सिद्दी (मोघुल नौसेना अधिकारी  ), मुघल, पोर्तुगीज , निझाम , बंगश आणि इतर अनेकांना पराभूत केले. 
•    १९ व्या शतकातील ब्रिटीशांच्या सत्ता स्थापनेपूर्वी , संपूर्ण  १८ व्या शतकासाठी उप - खंडा मध्ये वर्चस्व  गाजविणार्या मराठा साम्राज्याची उभारणी करण्याकरिता शिवाजी महाराजां नंतर बाजीराव हे एक महत्वाचे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात.

मृत्यू 

बाजीरावांचा मृत्यू सत्तेमध्ये असतानाच २८ एप्रिल, १७४० मध्ये झाला. जहागीरीची पाहणी करताना , वयाच्या ३९ व्या वर्षी अचानक आलेल्या तापि मुळे , शक्यतो उष्माघात झाल्यामुळे , त्यांच्यावर मृत्यचे सावट ओढावले. इंदोर शहराच्या नजीक, खार्गोने जिल्ह्यातील त्यांच्या लष्करी छावणीमध्ये ते दिल्लीला स्वतःच्या नेतृत्वाखाली असलेल्या एक लाख सैन्य दलासह मार्गस्थ झालेले होते. नर्मदा नदीच्या तीरावर , सानवाड खार्गोने इथे २८ एप्रिल १७४० रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सिंधीयांकडून त्यांचे स्मारक बांधण्यात आले. त्यांचे वास्तव्य असलेल्या वास्तूचे अवशेष आणि शिव मंदिर हि जवळच स्थापित केलेले आहेत.

बाजीराव मस्तानी भाग-7 मस्तानीची जीवनकथा

मस्तानी 

मस्तानी (१७०० - १७४०) या बाजीराव पेशवे पहिले मराठा सेनापती, मराठा साम्राज्यच्या चौथ्या मराठा छत्रपती ( साम्राज्य ) शाही जी राजे भोसले चे प्रधान मंत्री, यांच्या दुसर्या पत्नी होत्या. त्या एक  अतिशय सुंदर आणि शूर स्त्रीव्यक्तिमत्व होत्या असे म्हटले जाते.

पूर्व आयुष्य
मस्तानी या छत्रसाल महाराजांच्या कन्या म्हणून जन्माला आल्या. ऐकिवात कथेनुसार त्या छत्रसालांच्या दत्तक मुलगी होत्या.मध्य प्रदेश राज्यामध्ये , छत्रसाल जिल्ह्यापासून १५ किलोमेटेर दूर असलेल्या मौ सहनीय इथे त्यांचा जन्म झाला. धुबेला इथे आज इ मस्तानी  यांचा निवासी महाल आहे जिथे त्या नृत्य करत असत.

जीवनचरित्र 
बाजीराव पेशवे पहिले मस्तानिंशी निगडीत अनेक आख्यायिका आहेत. त्यांपैकी सर्वात जास्त माहितीत असणारी कथा म्हणजे त्या बुंदेल येथील राजपूत  नेते  छत्रसाल ( १६४९ - १७३१) जे कि बुंदेल खंड प्रांताच्या पन्ना संथानाचे संस्थापक होते , त्यांच्या  कन्या होत्या, ज्यांचा जन्म रुहानी बाई नामक अर्ध पर्शियन , हैदराबाद निझाम न्यायालयात असणाऱ्या नृत्यांगानेपासून झाला होता. जेंव्हा अलाहाबाद चे मुघल प्रमुख , मोहम्मद खान बंगश नि १७२७ - २८ मध्ये छत्रसाल वर आक्रमण केले , तेन्व्या चात्रासालांकडून बाजीराव पेशवे पहिले यांना मदतीच्या आशयाचा एक गुप्त संदेश धाडला गेला, त्यावेळी बाजीराव बुंदेल खंडांच्या परिसरामध्ये लष्करी मोहिमेवर होते. बाजीराव छत्रसालांच्या मदतीसाठी धावून आले. कृतज्ञते ची जान ठेवून  छत्रासालानी त्यांची कन्या मस्तानी सह आपल्या साम्राज्याचा तिसरा भाग , ज्यामध्ये झांसी , सागर आणि कल्पि चा हि समावेश होता , बाजीरावांना भेट केला. त्यांनी बाजीरावांना ३३ लाख सोन्याची नाणी देऊ केली. मस्तानी आणि बाजीरावांच्या लग्नामध्ये , काही गावांच्या नजराण्या बरोबर बाजीरावांना एक हिर्याची खान हि भेटी दाखल मिळाली.

असे असले तरी सुत्रानाम्ध्ये या बाबतीत तफावत आहे. छत्रासालांच्या दुसर्या दृष्टीकोनातून पाहिले असता त्या हैदराबाद निजामांच्या कन्या होत्या. १६९८ मध्ये निजामाचा छत्रसाल कडून पराभव झाला त्यावेळी निझामाच्या बायको कडून असा सल्ला मिळाला कि त्यांनी छत्रासालन च्या मुलीशी विवाह करावा जेणेकरून , त्या काळी मध्य भारतात प्रबळ साम्राज्य शक्ती बनलेल्या बुंदेला शी  सलोखा जपत येईल. आणि एका तिसर्या मूळ आख्यायिके नुसार , मस्तानी छत्रासालांच्या दरबारी नृत्यांगना  होत्या , बाजीराव आणि चात्रासाला यांच्या झालेल्या बैठकी नंतर  बाजीरावांनी छत्रासालांची मैत्री स्वीकारली त्यावेळी ते मस्तानी च्या प्रेमात पडले आणि त्यांनी त्यांच्याशी विवाह केला परंतु बाजीराव हे उच्च वर्णीय ब्राह्मण असल्या कारणाने तत्कालीन ब्राह्मण समाज आणि इतर हिंदू धर्मीय यांना हा विवाह मंजूर नव्हता..

तरीही , सर्वात जास्त स्वीकार्य कथेनुसार त्या छत्रासाल महाराजांच्या आणि त्यांच्या अर्ध पर्शियन मुस्लिम पत्नींच्या कन्या होत्या. मस्तानी चा सहसा उल्लेख बाजीरावांची प्रेमिका किंवा रखेल असाच केला जातो. असे असले तरी त्यांचा धार्मिक रीतीरिवाजांनी विवाह झालेला होता. घोडेस्वारी, भालाफेक आणि तलवारबाजी या युद्ध कलांमध्ये मस्तानी निपुण होत्या त्याच बरोबर त्या निष्णात गायिका आणि नृत्यांगणा होत्या. त्यांनी लष्करी मोहिमांमध्ये बाजीरावांना साथ दिलेली होती. काही महिन्यांच्या कालावधी मधेच बाजीरावांच्या पहिल्या पत्नी काशीबाई आणि मस्तानी या दोघींनीही बाजीरावांना मुलगे दिले. काशीबाईं च्या मुलावर फार लहानपणीच मृत्यू ओढावला. मस्तानी च्या मुलाचे नाव शमशेर बहादूर असे ठेवण्यात आले. 

बाजीरावांनी बंद च्या जहागीरीने शमशेर ( पेशवा ) ला सन्मानित केले. बाजीरावांच्या या मुलाने पानिपत च्या तिसर्या युद्धात , १७६१ मध्ये मराठ्यान कडून अहमद शह आणि अब्दाली यांच्या विरोधात युद्ध लढले , आणि असे म्हटले जाते कि या युद्ध मधेच तो मृत्युमुखी पडला.

बाजीरावांचे त्यांच्या अर्ध मुस्लिम असलेल्या पत्नी , मस्तानी साठीचे प्रेम त्यांच्या पहिल्या पत्नी काशीबाई यांच्याकडे दुर्लक्ष होण्यास कारणीभूत ठरत असलेल पाहून त्यांच्या आईंचा , राधा बाईंचा रोष बाजीरावांवर आला. राधा बाईंच्या आदाब खातीर बाजीरावांचे धाकटे बंधू चिमाजी आप्पा यांनी मस्तानीला हद्दपार केले. बाजीरावांच्या मुलाने , बालाजी याने हि , मस्तानी ला त्यांच्या वडिलांना सोडण्य साठी जबरदस्ती करू पहिली पण मस्तानीने या हि गोष्टीला नकार दिला.  मस्तानिवारचा बाजीरावांचा वाढता प्रभाव आणि काशीबाई कडे झालेले दुर्लक्ष पाहून, बाजीराव लष्करी मोहिमे वर असताना , संतप्त बालाजीने ,मस्तानीला काही काळासाठी घरामध्ये नजरकैदेत ठेवले.

पुणे शहरामध्ये काही काळासाठी मस्तानी बाजीरावांसोबत त्यांच्या घरी राहिल्या. महालाच्या उत्तर - पूर्व दिशेला मस्तानी महाल होता आणि बाहेर जाण्यासाठी वेगळे असे बाह्य प्रवेशद्वार होते,  ज्याला मस्तानी दरवाजा म्हणून ओळखले जाते. घरातील आणि कुटुंबातील वाढता संताप पाहून , १७३४ मध्ये , शनिवार वाड्यापासून काही अंतरावर च कोथरूड मध्ये बाजीरावांनी मस्तानी साठी स्वंतत्र निवास स्थान  बांधून घेतले. आज हि ती विद्यमान वास्तू कोथरूड येथील मृत्युंजय मंदिर येथे आहे. कालांतराने महाल मोडण टाकण्यात आला आणि त्याचे अवशेष राजा केळकर संग्रहालय येथे स्वंतत्र विशेष भागामध्ये आज हि पहावयास मिळतात. कोर्ट नोंदींमध्ये ( बखर ) बाजीराव सरकारच्या दरम्यान  मस्तानीचे कोणतेही संदर्भ समाविष्ट करण्यात आले नाहीत. इतिहासकारांनी असे नमूद केले आहे कि राजा केळकर संग्रहालय मध्ये आणि वाई च्या संग्रहालय मध्ये असलेली मस्तानीची चित्रे हि अस्सल नाही आहेत.

मस्तानी या अत्यंत निष्णात घोडेस्वार आणि योद्धा होत्या असे मानले जाते. त्या बाजीरावांना दैनदिन न्यायालयीन कामांमध्ये हि साहाय्य करायच्या असे म्हटले जाते. स्थानिक लोकांच्या दंतकथेनुसार, पुणे - सासवड रस्त्यालगत दिवे गावाजवळ असणारे तळ्याला मस्तानीने गावातील लोकांची पाण्याची सोय भागवण्या करिता बांधकामासाठी अनुदान केले होते.

मृत्यू
एप्रिल १७४० मध्ये, जेंव्हा बाजीराव त्यांच्या खारघर येथील जमिनीची पाहणी करत होते तेंव्हा ते अचानक आजारी झाले आणि मृत्युमुखी  पडले. काशीबाई, चिमाजी आप्पा, बालाजी    (नानासाहेब ) आणि मस्तानी खारगाव येथे आले.रावर खेड येथे,  नर्मदा नदीच्या काठावर २८ एप्रिल १७४० रोजी बाजीरावांच्या मर्त्य अवशेषाला अग्नीस सुपूर्द करण्यास आले. पुण्या जवळ च्या पाबळ गावात मस्तानी हि त्यानंतर लवकरच  मरण पावली.

मृत्यूचे कारण
एका प्रसिद्ध अशा लोक आख्यायिके नुसार , बाजीरावांच्या मृत्यूची बातमी काळातच , मस्तानीने स्वतःच्या बोटात घातलेल्या अंगातीतील विष प्रश्न करून आत्महत्या केली असे म्हणतात. काहीजानाचे असे हि म्हणे आहे कि तिने नवर्याच्या जळत्या चीतेमध्ये उडी घेऊन , ती सती गेली. खरे कारण जाऊन घेण्यासाठी कोणत्या हि प्रकारचे दस्तऐवज उपलब्ध नाहीत. तरी, हि गोष्ट तर खरी आहे कि बाजीरावांच्या मृत्युनंतर मस्तानी फार काळ जगली नाही आणि १७४० मध्ये मरण पावली.

मस्तानीची समाधी
मस्तानी ची समाधी पाबळ येथे आहे. तिला मस्तानी ची समाधी असे ओळखले जाते. श्री मोहम्मद इनामदार हे त्या समाधीची देखरेख करतात. 

काशीबाई नि मस्तानी च्या सहा वर्षीय मुलाला शमशेर ला (ज्याला कृष्णराव म्हणून हि ओळखले जाते ) स्वतःसोबत घरी नेले आणि स्वतःच्या मुलांच्या बरोबरीने त्याचे हि पालन पोषण केले.

Wednesday, July 11, 2018

बाजीराव मस्तानी भाग-6

दिल्लीची हकालपट्टी 

१७३५ पर्यंत मराठ्यांनी संपूर्ण गुजरात आणि माळवा वर नियंत्रण मिळविले होते. पण काही स्थानिक मुघल अधिकारी आणि जमीनदार यांच्या  अमलाखाली असणाऱ्या शहरांनी आणि भागांनी मराठा नियंत्रणाला स्वीकारण्यास नकार दिला. मुघल सम्राट मुहम्मद शाह पण मराठ्यांना त्यांचा चौथाई आणि सरदेशमुखी चा हक्क देण्याच्या अधिकृत आदेशासाठी टाळाटाळ च करत होता. मुघल साम्राज्याचे लक्ष वेधून घेण्याच्या बाजीरावांच्या प्रयात्नानाही दुर्लक्षित करण्यात आले. मराठ्यांनी स्वतःचा अधिकार बजावण्याचे ठरविले आणि लगतच्या राजस्थान च्या प्रदेशांमध्ये लूट करण्यास सुरुवात केली. मुघलांनी हि त्यांच्या वजीर कमरुद्दीन खान आणि मीर बक्ष खान दौरन यांच्या नेतृत्वाखाली आपले सैन्य पाठवून प्रतिकार केला. पण दोघांचे हि सैन्य मराठा सेनापतींकडून मार्गस्थ झाले (वजीरांच्या सैन्याला पिलाजी जाधवांनी पिटाळून लावले आणि राणोजी शिंदे , मल्हारराव होळकर यांनी मीर बक्ष च्या सैन्याला पराभूत केले .).

पेशवानि मग मुघलांना आयुष्य भरासाठी धडा शिकविण्याचे ठरविले. डिसेंबर १७३७ मध्ये बाजीराव स्वतः दिल्ली कडे सैन्य घेऊन निघाले. त्यांनी सैन्याला दोन भागांमध्ये विभागले. एका सैन्य तुकडीचे बाजीरावांनी नेतृत्व केले तर दुसर्या सैन्य तुकडीचे नेतृत्व पिलाजी जाधवांनी आणि मल्हारराव होळकरांनी  केले. असे असले तरी होळकरांच्या सैन्य तुकडीला प्रंचड सैन्य घेऊन चाल करून आलेल्या ,आग्रा चा शासनकर्ता आणि औध चा नवाब , सदात खान कडून मात खावी लागली. मल्हारराव होळकरांनी कशीबशी सुटका करून घेतली आणि ते बाजीरावांच्या नेतृत्वाखाली असलेल्या तुकडीला येउन मिळाले. या दरम्यान मराठ्यांची दहशत संपली आहे असा विचार करून , सदात खानाने दिल्लीला चांगली बातमी कळविली. त्याला आकलन झालेल्या यशाच्या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी , दिल्ली ला अक्षरशः असंरक्षित करून इतर मुघल सेनापती हि सहभागी झाले .हीच ती वेळ होती, जेंव्हा बाजीरावांच्या सैन्याने जलद हालचालीने ,दहा दिवसांच्या प्रवासाला फ़क़्त अठ्ठेचाळीस तासांमध्ये संपवून , तळ ठोकून असलेल्या मुघल लष्कराला पूर्णपणे ओलांडले आणि दिल्लीच्या उपनगरामध्ये (२८ मार्च १७३७ ) पोहोचले.

या नंतर जे होते ते म्हणजे दिल्लीच्या उपनगरांमधील मिळालेली एकंदरीत लूट. मुघल सम्राटाने स्वतःला सुरक्षितपणे लाल किल्ल्यामध्ये कोंडून घेतले, जेंव्हा बाजीरावांनी आणि त्यांच्या माणसांनी मिळालेली लूट ग्रामीण भागामध्ये मोठय आनंदाने वाटून टाकली. आठ हजाराचे सामर्थ्यवान सैन्य घेऊन मीर हसन कोका ने बाजीरावांवर चाल करून जाण्याचा प्रयत्न केला पण ते निष्फळ पणे पराभूत झाले आणि मीर हसन स्वतः झालेल्या झटापटी मध्ये घायाळ झाला. आणि या नंतर मुख्य मुघल सैन्याने आपले बुद्धी कौशल्य एकत्रित करण्या पूर्वीच  बाजीराव आपल्या लवाजम्या सकट दख्खन ला परतले. ३१ मार्च १७३७ ला बाजीरावांच्या विजयी सैन्याने प्रंचड लुटी सह जखमी आणि लीन झालेल्या दिल्ली ला मागे सोडले. परतीच्या मार्गावर बाजीरावांनी आपल्या अनेक विश्वासू प्रतिनिधीना उत्तर आणि मध्य भारताच्या अनेक ठिकाणी वसविले जेणेकरून नजीकच्या भविष्यामध्ये तिथे त्यांचे कायमचे प्राभावाशाली वास्तव्य होईल.

बाजीराव मस्तानी भाग-5


सिद्दी सोबत हत्ती युद्ध 

मराठा आणि सिद्दी (अबेशिनिअन मुस्लिम ) यांच्या मधला संघर्ष पुन्हा वर आला जेंव्हा सिद्दी (अबेशिनिअन ) फौजदार, सिद्दी सत्त याने कोकणातील परशुरामाच्या हिंदू मंदिराची विटंबना केलि आणि ब्रम्हेंद्र स्वामी नामक संताचा अपमान केला.  सावनुर च्या नवाबांनी जंजिराच्या सिद्दी ला एक हत्ती भेट दिला जो मराठ्यांच्या प्रदेश हद्दीतून ब्रम्हेंद्र स्वामींच्या शिष्यांकडून वाहला जात असताना वाटेमध्ये  मराठा सरखेल कान्होजी आंग्रे (नौसेनापती) यांच्या सैन्याकडून पकडला गेला, हि घटना १७२९ मध्ये घडली.हे सगळे स्वामीचे कारस्थान असल्याचे गृहीत धरून सिद्दी फौजदारांनी स्वामी शिष्यांशी भांडण केले आणि परशुराम मंदिराची तोडफोड केली.ब्रम्हेंद्र स्वामी अतिशय श्रद्धाळू गृहस्थ होते आणि यामुळे मराठा आणि सिद्दी यांच्या ऐतहासिक नात्यामध्ये तणाव निर्माण झाला.  या दरम्यान सिद्दी नवाब,  रसूल याकूत १७३३ मध्ये मरण पावले आणि त्यांच्या मुलांमध्ये वारसाहक्काचे युद्ध सुरु झाले. कान्होजी आंग्रे हि ४ जुलै, १७२९ मध्ये मरण पावले आणि मराठा सरखेल म्हणून त्यांचा वारसा हक्क त्यांच्या मुलाकडे सेखोजी आंग्रे कडे गेला. बाजीरावांनी अनुकूल वेळ पाहून आपल्या सैन्याला पाठवले आणि समुद्रावरून जंजिरा ला वेढा घातला. किल्ला आता पडायच्या बेतात होताच, पण १७३३ मध्ये सेखोजी च्या झालेल्या अकाली मृत्युनंतर, सेखोजी च्या भावाने, संभाजीने पेशवा कडून आदेश घेण्यास नकार दिला आणि त्याच्या असहकाराच्या वर्तणुकीमुळे वेढा काढून घ्यावा लागला. मराठ्यांच्या सुदैवाने , सिद्दीचा मुलगा अब्दुल रहमान याने आपल्या काका आणि चुलत भावांसोबत वारसाहक्काच्या समझोत्यासाठी बाजीरावांना विनंती केली आणि ज्यायोगे मराठ्यांनी त्याला हवी ती मदत देऊ केली. या बदल्यात सिद्दीचे आधीचे प्रदेश, जसे कि रायगड, रेवस, चौल आणि थल हे मराठ्यांचे प्रदेश म्हणून ओळखले जाऊ लागले(1736). बाकीच्या भावांनी हि मराठ्यांशी प्रतिकार करणे व्यर्थ आहे हे मान्य करून हार पत्करली. त्यांची सत्ता मोठ्या प्रमाणात संपुष्टात आल्यामुळे सिद्दी त्या नंतर केवळ जंजिरा, अंजनवेल आणि गोवळकोट च्या प्रदेश साठीच मर्यादित राहिले. त्यामुळे आता हत्ती युद्ध या नावाने या घटनेची सांगता झाली.

बाजीराव मस्तानी भाग -4

बुंदेलखंड 

मुघलांनी मुहम्मद खान बंगश शासका च्या खाली १७२७ पासून बुंदेलखंड ला घेराव घातलेला होता. स्वतः राजाने, छत्रसालांनी ( त्यांचे शिवाजी राजांच्या काळापासून चे मराठ्यांशी असलेले मैत्रीपूर्ण संबध लक्षात घेऊन ) मराठ्यांना मदतीचे आवाहन केले, पण मराठा सैन्य दुसरीकडे व्यस्त असल्यामुळे शाहू वेळेवर कुमक पाठवू शकले नाहीत. 

छत्रसालांनी मुघलांना कठोर प्रतिकार केला पण जैतपूर येथे अखेरीस मुहम्मद खान बंगश कडून घायाळ झाले आणि सरतेशेवटी पकडले गेले. छत्रसालांनी पुन्हा एकदा पेशवा बाजीरावांना विनंती केली (१७२९ मध्ये )कि त्यांनी मदतीला धावून यावे , ज्यामध्ये असे लिहिले होते,

"जो गत भई गजेन्द्र की वही गत हमरी आज,
बाज जात बुन्देल की बाजी राखियो लाज"


या वेळी , बाजीराव स्वतः बुंदेलखंड च्या समीप होते.( गऱ्हा, माळवा येथे ) आणि छत्रसाल चा बचाव करण्यासाठी सैन्यासह आले. मुघल सेनापती मुहम्मद बंगश ला जैतपूर मध्ये घेराव टाकण्यात आला, (आणि त्याच्या मुलाच्या सैन्याला हि , जो कि सैन्य मदत घेऊन मार्गस्थ होता ), आणि बंगश ला पराभव स्वीकारण्यास भाग पाडले. त्याने बाजीरावांना आर्जव केले कि दिल्लीपर्यंत चा मार्ग त्याला करून देण्यात यावा जे कि बाजीरावांनी बंगश पुन्हा कधीही छत्रसालांना उपद्रव पोहोचवणार नाही या अटी खाली मान्य केले.बाजीरावांवर अतिशय संतुष्ट असलेल्या राजा छत्रसालांनी खुल्या दरबारामध्ये इथून यापुढे  बाजीराव आपले मानस पुत्र असल्याचे जाहीर केले, आणि त्यांना आपली स्वतःची जहागिरी (त्यांच्या प्रदेशाचा एक तृतीयांश भाग ) देऊन सन्मानित केले , ज्यामध्ये सागर, बांदा आणि झासी चा समावेश होता (बाजीरावांनी या भागाचे व्यवस्थापन गोविंद पंतांकडे सोपविले - जे कि नंतर गोविंद पंत बुंदेले म्हणून ओळखण्यात आले.). छत्रसालांनी ,बाजीरावांना दुसरी पत्नी करून घेण्यासाठी  आपली मुलगी मस्तानी (जी त्यांना त्यांच्या पर्शिअन मुस्लिम बायकोपासून होती )हिस हि बाजीरावांनी भेट केली. नंतर मस्तानी ने बाजीरावांच्या मुलाला जन्म दिला ज्याचे नामकरण शमशेर बहाद्दूर असे करण्यात आले.

Tuesday, July 10, 2018

बाजीराव मस्तानी भाग-3


पालखेडची लढाई 

हल्ल्याची बातमी ऐकून बाजीरावांच्या सैन्याने पुण्याकडे प्रस्थान केले.  निझामाचे सैन्य मोठ्या संख्येने आणि तोफखान्या ने पेशव्याची वाट पाहत होते. पण जिथपर्यंत लढाई च्या डावपेचांचा प्रश्न होता, पेशवा निझामापेक्षा एक पाऊल पुढेच होते. लढाई च्या मैदानामध्ये निझामाच्या शक्तीशाली तोफखान्याला तोंड देण्यापेक्षा , त्यांनी निझामाच्या अखत्यारीत असणाऱ्या प्रदेशांना वळसा निर्माण करून जालना, खानदेश आणि बुऱ्हानपूर कडे कूच करीत , निझामाच्या तावडीत असलेल्या श्रीमंत मुघल चौकी ला लुबाडण्यास सुरु केले. त्यामुळे  बाजीरावांनी निजामाला त्याचा तळ सोडण्यासाठी चिथवुन दिले आणि पेशवा चा पाठलाग करण्यास  प्रवृत्त केले. असे असले तरी, पेशवा सैन्या ला पकडण्यासाठी निजामाला त्याचा जड तोफखाना मागे सोडावा लागला.  चतुर पेशव्यांना अगदी हीच गोष्ट हवी होती. जसे जसे निझामाचे सैन्य पेशवा कडे कूच करीत होते, पालखेड ला मध्यवर्ती ठिकाणी (औरंगाबाद जवळील एक पहाडी मुलुख ) पेशव्यांनी निजामाला सापळ्यात पकडले आणि घेराव टाकला. निझाम स्वतः संदिग्ध अवस्थेमध्ये सापडला, अन्न आणि पाण्याशिवाय कित्येक दिवस , शिवाय भोवती घेराव.  निजामाला लवकरच मुंगी शेवगाव (६ मार्च १७२८ ) येथे एक अपमानजनक तह करण्यासाठी भाग पाडले गेले, या शिवाय निझामाने शाहुना पूर्णपणे एकट्याना छत्रपती मानणे स्वीकारले तसेच दुसरे संभाजी यांना कायमसाठी सोडले. मराठ्यांचा चौथाई च्या हक्काला हि या द्वारे मान्यता मिळाली.

बाजीराव मस्तानी भाग-2

निझाम - उल - मुल्क सोबत संघर्ष 


निझाम-उल-मुल्क-उददिन-खान , असिफ झा I, दख्खन चे मुघल व्ह्वाइसरॉय ( निझाम - उल - मुल्क ) (ज्यांचे वास्तव्य हैदराबाद इथे असे ). ज्यांना मुघल साम्राज्याच्या दुबळ्या नियंत्रणाची जाणीव झालेली होती, त्यांनी दख्खन मध्ये स्वतःचे स्वतंत्र राज्याची स्थापना करण्याचे ठरविले होते.

निझामाने दख्खन प्रदेशमधील चौथाई देण्याकडे मराठ्यांच्या हक्का कडे दुर्लक्ष केले. शांततेमध्ये समझोता करण्याचे सुरुवातीचे प्रयत्नहि  (चिखलठाणा तहाची बोलणी करण्यासाठी बोलावलेली सभा 1721) दिल्ली कोर्टाच्या मुघल-मराठा तहाच्या पुन्ह्पुष्टी केल्या नंतर सुद्धा फिसकटले. पण १७२२ मध्ये , निझामाच्या मनातील सुप्त इच्छा मुघल साम्राज्यासमोर उघडकीस आल्या आणि त्या नंतर मुहम्मद शाह ने निझामाला बाजूला करण्यास सुरुवात केली. निझामाने उघडउघडपणे मुघल साम्राज्य विरुद्ध बंड पुकारले आणि हैदराबाद राजधानी घोषित करून त्याने स्वतःचा असा स्वतंत्र मुलुख जाहीर केला. मुबारीझ खान च्या नेतृत्वाखाली जेंव्हा साम्राज्याच्या सैन्याने दिशाभूल झालेल्या निजामाला पकडण्याचा प्रयत्न केला, तेंव्हा आपल्या जुन्या शत्रूंकडून , मराठ्यांकडून मुहम्मद शाह ने मदतीची मागणी केली आणि मराठ्यांच्या  आधीच्या केलेल्या सगळ्या मागणींची पूर्तता करण्यासाठी सहमती दर्शविली. शाहू नि निजामाला बाजीरावांची आकस्मिक मदत पाठविली. १७२४ मध्ये साखरखेडा येथे त्यांच्या सामाईक लष्कर सैन्याने शाही सैन्याला जिंकून घेतले. 

निझामाने संभाव्य धोका पाहून पळ काढला, आणि मराठ्यांच्या सन्मानाच्या शब्दांना नाकारून पुन्हा एकदा मराठ्यांना डिवचून दिले. त्याने याशिवाय कोल्हापूर चे संभाजी दुसरे , चंद्रसेन जाधव, उदाजी चव्हाण आणि राव रंभा निंबाळकर यांच्याशी संधान साधून शाहू विरुद्ध टेकू लावून घेतला. जेंव्हा पेशवा आणि त्यांचे सैन्य दक्षिणेमध्ये चौथाई वसूल करण्यास गेले, (१७२७ मध्ये ), त्या वेळेस निझामाच्या सैन्याने आश्चर्य कारक पणे पुण्यावर हल्ला केला आणि  दुसरे संभाजी यांना छत्रपती म्हणून स्वीकारलेले जाहीर केले.(सातारा मध्ये हि धोक्याचे वातावरण पसरले आणि सासवड जवळील पुरंदर किल्यामध्ये स्वतः शाहुना प्रवेश नाकारला गेला.)

Monday, July 9, 2018

बाजीराव मस्तानी भाग -1

बाजीराव बल्लाळ 


बाजीराव बल्लाळ ( बालाजी ) ( १८ ऑगस्ट, १७०० - २८ एप्रिल, १७४०), पहिले बाजीराव या नावाने हि ओळखले जाणारे , नावाजलेले सेनापती ज्यांनी मराठा पेशवा (प्रधान मंत्री ) म्हणून मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती (सम्राट) छत्रपती शाहू राजे भोसले यांच्या अखत्यारीत १७२० पासून मृत्यू पर्यंत सेवा केली. त्यांना थोरले बाजीराव म्हणून हि ओळखले जात. 'राऊ' या टोपण नावाने हि ते लोकप्रिय होते.

बाजीरावांनी ४१ युद्धे लढली आणि त्यातले एक हि ते हरले नाहीत.

मराठा साम्राज्य वाढवण्याचे श्रेय बाजीरावांना दिले जाते , विशेषतः उत्तरेमध्ये , ज्यामुळे बाजीरावांच्या मृत्यू च्या वीस वर्षा नंतर हि  , त्यांच्या मुलाच्या कारकीर्दीमध्ये कळस गाठण्यास मोठे योगदान मिळाले.  नऊ मराठा पेशाव्यांपैकी बाजीराव हे सर्वात जास्त प्रभावी व्यक्तिमत्वाचे पेशवे म्हणून ओळखले जातात. असे म्हटले जाते कि ते "हिंदू पद पादशाही " (हिंदू साम्राज्य ) च्या स्थापनेसाठी लढले. 

बाजीरावांचा जन्म , छत्रपती शाहू चे पहिले पेशवा असणाऱ्या , बालाजी विश्वनाथ यांचा मुलगा म्हणून , मराठी चित्पावन ब्राह्मण घरामध्ये झाला. पेशवा पदासाठी जास्त अनुभवी आणि वयस्कर दावेदार असतानाही , वडिलांच्या मृत्युनंतर , वयाच्या विसाव्या वर्षी , शाहुंनि ,  बाजीरावांची पेशवा म्हणून नियुक्ती केली. या नियुक्ती मुळे ,पोरसवद्या वयातील बाजीरावांना पेशवा पद देणे म्हणजे शाहुना बाजीरावांच्या कमी वयातच त्यांच्या प्रतिभेची झालेली जाणीव होती हे स्पष्टपणे कळून येते. बाजीराव त्यांच्या सैनिकांमध्ये हि लोकप्रिय होते आणि आज हि त्यांचे नाव सन्मानपूर्वक घेतले जाते.

१७६० मध्ये मराठा साम्राज्याच्या अमलाखाली असलेला प्रदेश ( पिवळा ), जहागीरदारी शिवाय.

आख्यायीकांमध्ये असे सांगितले जाते कि , शाहू महाराज आणि दरबारी समोर , उंच , संयमी आणि आत्मविश्वासाने उभे ठाकलेल्या बाजीरावांच्या शब्दांनी गर्जना केली ,
"चला, दक्खनेच्या पलीकडे जाउन मध्य भारतावर विजय मिळवूया. बायकांच्या आणि दारूच्या नशेमध्ये मुघल निष्क्रीय झालेले आहेत. उत्तरेच्या तहखान्यांमध्ये शतकांपासून  जमा असलेली संपत्ती आपली होऊ शकते. वेळ आलेली आहे कि या पवित्र भारतवर्षा मधून आचारशुन्य  लोकांना बाहेर काढण्याची.  ते जिथून आले आहेत त्यांना त्या हिमालयामध्ये परत धाडूया. मराठा साम्राज्याचा ध्वज कृष्णे पासून सिंधू पर्यंत फडकायलाच हवा. हिंदुस्थान आपला आहे ."

त्यांनी आपली नजर शाहू महाराजांवर रोखली आणि ते म्हणाले,
    "घाव, घाव घालायचे बुंध्यावर म्हणजे त्याच्या फांद्या आपोआप खाली पडतील. ऐका, मी काय म्हणतो आहे ते, मराठा साम्राज्याचा केसरी अटकेवर फडकविन!
    शाहू अतिशय प्रभावित झाले आणि उद्गारले ,"तुम्ही तो स्वर्गातीत हिमालयावर हि फडकवताल"


या कथेमधून बाजीरावांची असामान्य दृष्टी आणि या तरूणा वरचा शाहू महाराजांचा गाढ विश्वास दिसून येतो. बाजीरावांची प्रतिभा ओळखून आणि मुघल - मराठा विरुद्ध झालेलि लढाई जिचा शेवट १७०७ मध्ये झाला , त्यामध्ये विजय प्राप्त करून मिळालेल्या शाही सैन्याचा विश्वास त्यांच्या वर टाकून शाहू महाराजांनी तरुण वयामध्येच बाजीरावांची पेशवा पदी नेमणूक केली. बाजीरावांचा मोठेपणा इथेच दिसून येतो, आपल्या स्वामीच्या व्यक्तव्व्याला  खरेपणा देत आणि अनुभवी सैन्याची व्यवस्था लावत, त्यांनी मराठा लष्करासोबत भारताच्या उपखंडावर विजय प्राप्त करून दहशत बसविली. १७५८ मध्ये झालेल्या, अटक लढाई मध्ये , अखेरीस सिंधू नदीच्या काठावर वसलेल्या अटक वरती १७५८ मध्ये च मराठ्यांनी विजय मिळविला.