Friday, August 3, 2018

कंडोमचा वापर न करता देखील गर्भधारणा रोखता येते का? जाणून घ्या…

कंडोमचा वापर न करता देखील गर्भधारणा रोखता येते का? जाणून घ्या…
अनेकदा असं होतं की भावनांच्या भरात आपण काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि नंतर त्याचा परिणाम भोगावा लागतो. सेक्सचं देखील असचं आहे. प्रेमभावनेत वाहत गेल्याने आपल्याला अनेकदा सुरक्षेचा विसर पडतो आणि मग त्यानंतर त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो. आजकाल सर्वच कपल त्यांना कधी आई-वडील व्हायचं आहे ह्याचं प्लानिंग करतात. म्हणजे जर नुकतचं लग्न झालेलं असेलं, किंवा दोघेही जॉब करत असतील, किंवा सध्या आई-वडील ही जबाबदारी स्वीकारण्याची तयार नसेल, अशी सर्व कारणे त्या प्लानिंग मागे असतात.
मग त्यासाठी शरीर संबंध बनविताना अनेक जोडपे कदाचित कंडोमचा वापर करत असतील. पण कधी-कधी भावनांच्या भरात आपल्याला कंडोमचा विसर पडतो आणि मनाची काहीच तयारी नसताना आपल्याला पालकत्व स्वीकाराव लागतं. आणि मग त्यातून पती-पत्नीच्या नात्यातील ताणताणाव, दुरावा हे सर्व घडून येतं.

हे सर्व होण्यापेक्षा तयारी नसताना गर्भधारणा होऊच न देणे हाच सर्वात उत्तम मार्ग. पण तुम्हाला हे माहित आहे का की, तुम्ही कंडोमचा वापर न करता देखील गर्भधारणा रोखू शकता? होय कंडोम व्यतिरिक्त इतर अनेक असे उपाय आहेत ज्याने तुम्ही गर्भधारणा रोखू शकता आणि आपले जीवन हवे तसे जगू शकता.

बर्थ कंट्रोल पॅच

हा एका प्रकारचा पॅच असतो, ज्याला स्त्रिया आपल्या शरीराला चिटकवू शकतात. हा Estrogen आणि Progestin हार्मोन्सना रिलीज करून प्रेग्नसीला थांबवतो. योग्य प्रकारे वापरल्यास ही पद्धत ९९% यशस्वी ठरू शकते. पण ह्याला वापरण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Birth control implant

हा काडीपेटीच्या काढीएवढ्या आकाराचा रॉड असतो. ह्याला स्त्रीच्या शरीरात इम्प्लांट केले जाते. हा देखील हार्मोन्सना रिलीज करून गर्भधारणा होण्यापासून थांबवतो. Birth control implant ४ वर्षांपर्यंत काम करते. तरी ह्याचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा.

Spermicides

हे देखील एक प्रकारे गर्भनिरोधक म्हणून काम करते. जे पुरुषाच्या वीर्यला अंडाशयापर्यंत पोहोचू देत नाही. ह्याचा वापर सेक्सपुर्वी केला जातो. पण ह्याचा वापर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

सुरक्षित आठवडा
स्त्रियांच्या मासिक पाळीच्या पहिल्या दिवसानंतरच्या ८ व्या दिवसापासून ते २० व्या दिवसापर्यंतचा काळ हा सेक्स साठी सुरक्षित काळ मानला जातो.

पुल अॅण्ड प्री मैथड
जर तुम्ही सेक्स करतानाच्या शेवटच्या क्षणांत स्वतःवर नियंत्रण ठेवून आपल्या साथीदारापासून दूर होऊ शकत असाल तर ह्या पद्धतीने देखील गर्भधारणेला थांबवले जाऊ शकते. आणि ह्यासाठी तुम्हाला न कंडोमची गरज ना कुठल्या इतर गोष्टीची. तसेच ह्याचा सक्सेस रेट हा देखील कंडोम इतकाच आहे. ह्या पद्धतीचा सक्सेस रेट हा ८३% आहे तर कंडोमचा ८४%.

IUCD मेथड

आजकाल IUCD ही पद्धती स्त्रिया जास्तकरून वापरतात. ह्याला डॉक्टरकडून स्त्रियांच्या शरीरात इम्प्लांट केले जाते, ज्यामुळे गर्भधारणा थांबवता येते. तुम्ही ह्याला आपल्या सुविधेनुसार काढू देखील शकता.

गर्भनिरोधक गोळ्या
तुम्ही गर्भधारणा थांबविण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचा देखील वापर करू शकता. पण ह्या गोळ्या घेतल्याने हार्मोनल असंतुलन होऊ शकते. त्यामुळे ह्यांचा वापर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.

कंडोम वापरण्यात अडचणी असतील तर यापैकी काही सोयीच्या पद्धती वापरून तुम्ही अनपेक्षित संततीप्राप्ती थांबवू शकता.

आमचे इतर लेख वाचण्याकरिता क्लिक करा  yzstories.blogspot.com

संभोगवेड्या माणसांसाठी संभोगतील आनंद कसा घ्यावा व द्यावा

संभोग करताना कराव्यात काही गोष्टी
प्रणय किंवा इंग्रजीमधल्या लोकप्रिय नावाने संपूर्ण जगात प्रसिद्ध असणारा “सेक्स” ही तसं पाहायला गेलं तर मानवी आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. निखळ आनंद देणारी, दोन व्यक्तींमधील नाते फुलवणारी, प्रेमाचे नाते अधिक घट्ट करणारी. तरीही जिथे शारीरिक संबंधांचा प्रश्न येतो तिथे बऱ्याच गोष्टींपासून प्रेमीजन अनभिज्ञ असतात.तरीही अनेकदा याच कारणावरून जोडप्यांमध्ये भांडणे होत राहतात. सेक्समधला विसंवाद हा घटस्फोटाचे कारण देखील बनतो.याच्या मुळाशी जावून पाहिलं तर फक्त hardcore sex आणि love making या दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात ज्यामधील फरक अनेक जोडप्यांना न समजल्या मुळे तो त्यांच्यातील विसंवादाचं कारण बनतो. जाणून घेवू या सेक्स च्या काही अशाच अनाभिज्ञ पैलूंबद्दल..

सेक्स करण्याच्या आवडीनिवडी व्यक्ती परत्वे भिन्न असतात. आपल्या पार्टनर बरोबर कशा प्रकारचे संबंध ठेवायचे आणि ते फुलवायचे हा सर्वस्वी जोडप्यांच्या संमतीचा भाग असतो.

१. स्वत:च्या जोडीदाराला समजून घ्या :


स्वत:ला आणि स्वत:च्या जोडीदाराला समजून घेणे, त्याच्या शारीरिक बाबींचा विचार करणे, शारीरिक संबंध बनवताना जोडीदाराच्या इच्छेचा विचार करणे, स्त्री जोडीदाराला फुलवणे, शृंगार करणे या गोष्टी प्रेम फुलवण्यास मदत करीत असतात.

शरीराचं मिलन हे केवळ फक्त शारीरिक पातळीपर्यंत मर्यादित नसतं. माणूस आणि पशु मध्ये हा एक महत्वाचा भेद राहतो. पशु हे केवळ निसर्गानियमा नुसार प्रजाती वाढवण्यासाठी ते ही विशिष्ट मौसमात त्यांच्या शारीरिक क्रीडा करतात. माणसाच्या बाबतीत हीच गोष्ट सर्वस्वी भिन्न राहते.शारीरिक संबंधात स्त्री च्या मनाचा विचार करणे आवश्यक ठरते कारण तिला केवळ लैंगिक कृतीपेक्षा प्रेम, सहवास, स्पर्श या गोष्टींची भूक असते. तिला फुलविल्या विना केवळ स्वत:च्या सुखाचा विचार जिथे केला जातो तिथे शारीरिक संबंध प्रणयक्रीडा न राहता फक्त एक बळजबरी होवून जाते.
असा प्रणय निव्वळ उपभोग बनून जातो ज्याचा आनंद फार काळ टिकत नाही आणि त्यातून प्रेमाचा बंध ही निर्माण होत नाही.


२. दोघांमधील कनेक्शन :

शरीर संबंध करणाऱ्या दोन व्यक्तीमध्ये प्रेम असेल, त्यांची केमिस्ट्री जुळलेली असेल तरच तृप्ततेचा अथवा पूर्णत्वाचा आनंद मिळतो.
खरे पाहता प्रणय क्रीडे मध्ये ज्याला peak-point किंवा orgasm असं म्हटलं जातं, तो एक छोटा हिस्सा असतो. बऱ्याचदा हे लोकांच्या लक्षात येत नाही.
केवळ फक्त तृप्ती मिळवण्यासाठी केला जाणारा शरीरसंबंध हा खूप वेळा मानसिक दरीच कारण बनतो. शरीरसंबंधा मध्ये एकमेकांसाठी दिला जाणारा वेळ, स्पर्श, एकमेकांच्या आवडीनिवडी समजून घेण्याची मानसिकता या गोष्टी तृप्ती होण्यासाठी आवश्यक असतात.या गोष्टींचा जर अभाव असेल आणि फक्त एक pick point मिळवण्याच्या हेतूने प्रणयाच्या नावाखाली यांत्रिक क्रिया केली जात असेल तर अशा संबंधामधून प्रेम वाढीस लागत नाही.

३. चुंबन

चुंबन क्रिया प्रणया मधील आनंद आणि गोडवा वाढवते त्यामुळे ही पायरी वजा न करता हर एक जोडप्याने स्वत:चा आणि स्वत:च्या जोडीदाराचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी केली पाहिजे.
खर तर हा शारीरिक संबंध फुलवण्याच्या प्रक्रियेमधला महत्वाचा भाग असतो. जी जोडपी प्रेमात असतात किंवा प्रेमात पडलेली असतात त्यांच्यामधील प्रेम फुलवण्यासाठी चुंबन ही पहिली पायरी असते. प्रणयक्रीडे मध्ये चुंबनाचे अनन्यसाधारण महत्व आहे.खूप वेळा जोडप्यांना किंवा जोडप्यामधील कुणाही एकाला यामध्ये रस नसतो. याची करणे वेगवेगळी असू शकतात. मात्र प्रेमात आणि संबंधामध्ये अनेक अशा गोष्टी असतात ज्याला पहिल्या प्रथम जोडीदाराची संमती नसते पण अशा गोष्टी केल्या तर एकमेकांमधील प्रेम फुलण्यासाठी मदत होवू शकते.

४. प्रणया नंतरची उत्तरक्रिया :


हा सगळ्यात दुर्लक्षित राहिलेला भाग. बऱ्याचदा शरीरसंबंधामध्ये आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर पुरुष समाधानी होवून झोपी जातो. बऱ्याचदा अशा वेळी स्त्रीला पुरुषाने आपल्याला असे तटकन तोडून टाकावे या गोष्टीचा कुठेतरी राग येत राहतो.प्रणया नंतरच्या उत्तरक्रिये मध्ये आपल्या जोडीदाराबरोबर हितगुज करणे, त्याच्याशी बोलणे, त्याला कुरवाळणे, कुशीत घेवून झोपणे अशा गोष्टी शरीरसंबंधा मधील रंगत वाढवतात. प्रेम वाढवतात.
अशा रीतीने जोडप्यांना शरीरसंबध हे केवळ एक शारीरिक क्रिया अथवा उपभोगाचा प्रकार न राहता त्याला संस्मरणीय प्रणय क्रीडा बनवायचे असेल तर वर दिलेल्या गोष्टी लक्षात ठेवून त्याचा अंमल करावयास हरकत नाही.

Thursday, August 2, 2018

एका नव-याने मांडलेलं मत


पिरेड अर्थात मासिक पाळी आली की आई, चुलत्या आणि घरातल्या, गल्लीतल्या बायका लांब बसायच्या. आम्ही लहान पोरं त्यांच्याकडे गेलो की, 'अय तिकडं लांब खेळा, शिवू नका' अशा सुचनावजा धमक्या मिळायच्या. चुकून कधी शिवलचं तर घरात बापाकडून किंवा अन्य पुरुषाकडून मार बसायचा. मग आईला विचारायचो ' आय, का गं, शिवायचं नाही' तर आई कावळ्याने शिवलय, देवाने सांगितलंय अशी कारणं सांगून दूर राहायला सांगायची. एखाद्यावेळी शिवलं तर गाईच्या पाया पडायला लावायची. लहान लेकराला माफ असतंय म्हणून कुशीत घेऊन झोपायची. तिला 4 दिवस पाणी, जेवण आणि सगळंच लांबून मिळायचं. भांडी घासणे, कपडे धुणे अशी कामे मात्र तिने केली तरी चालायची. म्हणजे त्या चार दिवसात तिच्याकडे हे अधिकच काम वाढायच. तिची या चार दिवसातली कपडे वेगळी असायची, जी तिला पाचव्या दिवशी धुवून टाकावी लागायची. आई, घरात कुणी नसताना पाय चेपून दे म्हणायची तर आम्ही खेळायला पळून जायचो. मात्र या अजाणत्या वयात अशिक्षितपणामुळे एकही जाणता पुरुष अथवा स्त्री भेटली नाही की जो 'चार दिवसाचं' महत्व आणि त्रास समजावून सांगेल.
बरंच मोठं होईपर्यंत ही चार दिवसाची भानगड कळाली नाही. मग कॉलेजवयात काही मैत्रिणी आणि प्रेमात पडल्यावर प्रेयसी अर्थात बायकोकडून ही भानगड नेमकी काय असते ते समजलं. शिक्षित आणि खुल्या विचारांच्या काही मैत्रिणी यावर भरभरून बोलायच्या तेंव्हा 'पिरेड' समजू लागला. मात्र त्यांच्या बोलल्याने त्याची तीव्रता कळाली नाही. प्रेमात पडल्यावर म्हणजे बायकोशी मुक्तपणे बोलायला लागल्यावर ह्या दिवसांची तीव्रता आणि त्रास समजायला लागला. तिला त्रास व्हायला लागल्यावर ती ढसाढसा रडायची, तेव्हा दूर असल्याने मी काहीच करू शकत नसायचो, त्यावेळी पुरुष असण्याची लाज वाटायची.

आज, मात्र ह्या गोष्टीला आम्ही आनंदाने जगतो. मी स्वतः तिला दुकानातून काळ्या पिशवीत न घालता सॅनिटरी नॅपकिन आणून देतो. खरतर चार दिवस हे नावाला असतात. मात्र पाळी येण्याच्या आधी दोन दिवस, पाळीचे चार दिवस त्रास आणि त्यांनंतरचे दोन-तीन दिवस अशक्तपणा या गोष्टीचा सामना महिलांना करावा लागतो. या चार दिवसात पहिल्या दोन दिवस त्यांना फार त्रास होतो. यावेळी त्यांना जवळीकीची आणि प्रेमाची गरज असते. प्रेमाने बोलणारे, मायेचे शब्द हवे असतात. यावेळी हातपायाचा गळाटा झाल्याने हातपाय चेपून देण्याची गरज असते.

आपण शिक्षित आहोत म्हणून या अपेक्षा आपण नक्की पूर्ण करू शकतो. अभिमानाने सांगत नाही मात्र, मी या चार दिवसात घरातलं जास्तीत जास्त काम करतो आणि तिचा ताण कमी करतो. (तसं मी रोजच लागेल ती मदत तिला घरकामात करतो) हा काळ फार नाजूक असतो. या नाजूक काळात बायकांचे मूड सेन्स बदलतात यामुळे चिडचिड, राग, रडणे या गोष्टी अचानक होतात. यामुळे आपण न चिडता त्यांच्या भावना समजून घेऊन प्रेमाने वागणे महत्वाचे असते. तिच्यासाठी कॅडबरी, आईस्क्रीम अशा छोट्या-छोट्या गोष्टी आणतो. तिला चहा करून देतो. अंग चेपून देतो. दोघेच असल्याने तिला आवडणारे खिचडी, ऑम्लेट, अंडामॅगी अशा गोष्टी ऑफिसवरून आल्यावर करून देतो. अर्थात हे तिच्या त्रासापेक्षा फार मामुली आहे. कसय या गोष्टींनी विशेष काही फरक नाही पडत. मात्र त्यांचा त्रास कमी होतो आणि आपल्यावर दुपटीने प्रेम करतात ह्या बायका. फार हळव्या असतात हो बायका. आपल्या अनेक चुकांना ह्या प्रेमामुळे कुणी पदरातनाही घेतलं तर त्या नक्की घेतात. नाहीतरी पुरुषत्वासारख्या भिकार गोष्टीशिवाय आपल्याकडं विशेष आहे तरी काय? त्यामुळे हे संपवू, नाही संपलं तर कमी तरी करूच.